Get Mystery Box with random crypto!

लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_sex_diseases — लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_sex_diseases — लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕
चैनल का पता: @marathi_sex_diseases
श्रेणियाँ: स्वास्थ्य , प्रेमकाव्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 968
चैनल से विवरण

तुमच्या लैंगिक समस्या व त्यांचे समाधान...!
मुख्य चॅनेल - @sex_marathi

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-01-05 19:30:29 जननेंद्रियांची स्वच्छता कशी करावी ?

वाढते प्रदूषण व त्याचा त्वचेवर, केसांवरील होणारा परिणाम ह्यामुळे नियमित अंघोळ करणे महत्वाचे आहे. प्रत्येकजण स्वच्छ अंघोळ करताना नाक, कान, डोळे, हात स्वच्छ ठेवतो. परंतु लिंग, गुदद्वाराच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे पहात नाही. ज्यामुळे शिश्नमल साठणे, जांघेमध्ये भुरशीचा आजार निर्माण होणे (ज्याला ग्रामीण भाषेत 'उष्णता' हा शब्द प्रचलित आहे.) हे घडते. याला कारण आहे लहानपणी पालकांकडून 'चूप बस गधड्या तिथे हात लावायचा नाही' असा चुकीचा सल्ला दिला जातो. यातूनच लिंग व गुदद्वार की त्या अवयवांतून मूत्र व मलविसर्जन होते ती जागा घाण आहे अशी शिकवणूक मिळते व तीच शिकवणूक पिढ्यानपिढ्या पुढे जाते.

स्वच्छतेचे नियम -
रोज अंघोळ करताना पुरुषाने स्वतःच्या लिंगावरील कातडे मागे सरकावून त्यावर साठलेला शिश्नमल साबण लावून, कोमट पाण्याने धुवून काढावा.

यासाठी कोणताही अतितिव्रतेचा साबण वापरू नये. कारण शिश्नमुंडावरील त्वचा पातळ असते. इजा होण्याची शक्यता असते.

नंतर कोरड्या टॉवेलने हलकेच टिपून घ्यावे. नंतर शिश्नमुंडावरील त्वचा पुढे सरकावून ठेवावी.

पुरुष जननेंद्रियाच्या जवळील केस वाढवावे की कमी करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. घामाचा त्रास होत असेल तर केस कमी ठेवणे योग्य आहे.

स्त्री जननेंद्रियांची स्वच्छता ठेवताना स्त्रीने बृहतभगोष्ठ, लघुभगोष्ठ व भगशिश्नीका यांची स्वच्छता राखावी. जास्त करून भगशिश्नीकेवरील त्वचा मागे करून त्यावरील साठलेला मल धुवून काढावा.

योनीमार्गात साबणाने स्वच्छता करणे टाळावे. कारण यात शरीरास हितकारक असे जंतू असतात जे साबण वापरल्याने नष्ट होऊ शकतात. त्यामुळे योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
668 views16:30
ओपन / कमेंट
2022-01-02 16:09:47
डॉ. राहुल पाटील यांचे लेख कोणी कोणी वाचले आहेत किंवा वाचत? Do you ever read Dr. Rahul Patil articles?
Anonymous Poll
27%
हो/Yes
40%
नाही/No
33%
नाही ऐकला कधी/Never Heard about it
372 voters109 views13:09
ओपन / कमेंट
2022-01-01 19:30:12 अनेक गर्भनिरोधक साधनांप्रमाणे कॉपर-टी मुळे देखील अनावश्यक गर्भधारणेचा धोका नसल्याने असल्याने तुम्हाला सेक्सलाईफचा व्यवस्थित आनंद घेता येतो.काही महिलांना सेक्स करताना कॉपर-टीच्या दो-याचा अडथळा होईल अशी भीती वाटते पण हा दोरा तुमच्या योनीमार्गाच्या वरच्या भागात असल्याने सेक्स करताना तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला त्याचा त्रास होत नाही.

९. कॉपर-टी पेक्षा गर्भनिरोधक गोळ्या घेणे फायद्याचे ठरते का?

प्रत्येक गर्भनिरोधक साधनांचे काही चांगले व वाईट परिणाम असतात.मात्र कॉपर-टी मुळे तुमच्या हॉर्मोनल सायकलवर कोणताही प्रत्यक्ष दुष्पपरिणाम होत नसल्याने ते एक सुरक्षित गर्भनिरोधक साधन आहे.

१०. कॉपर-टी मुळे गंभीर पाठदुखी होते का?

कॉपर-टी मुळे पाठदुखी होत नाही.प्रसुतीपुर्व चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे मणक्यातील स्नायू सरकल्यास किंवा कॅल्शियम आणि विटामिन डी च्या कमतरतेमुळे पाठदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
524 views16:30
ओपन / कमेंट
2022-01-01 19:30:12 स्रियांचे गर्भ निरोधक पद्धत..." कोपर्टी "

डॉ.बंदीता सिन्हा
नवी मुंबईतील एस.डी.डी हॉस्पिटलच्या
consultant obstetrician and gynaecologist. यांचा हा महत्वाचा सल्ला जरुर वाचा.


भारतामध्ये गर्भनिरोधनाच्या साधनांमध्ये कॉपर-टी चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो.कारण या साधनामुळे गर्भधारणा पाच वर्षे पुढे ढकलण्यास मदत होते.काही जणींना तर दहा वर्षे देखील कोणत्याही त्रासाविना या साधनाचा फायदा होऊ शकतो.मात्र अनेक तज्ञ डॉक्टर महिलांना कॉपर-टी बसवण्याचा सल्ला मुले झाल्यानंतरच देतात. संततीनियमनाच्या या पद्धतीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असू शकतात.

१. कोणत्याही सेक्शूअली अ‍ॅक्टीव्ह महिलेला कॉपर-टी बसवता येते का?

फक्त आई न झालेल्या महिला व मुलींनाच कॉपर-टी न बसवण्याचा सल्ला दिला जातो.कारण प्रेगन्सीमध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक व हॉर्मोनल बदल होतात.गर्भारपणात गर्भाशयाची वाढ होते तर प्रसुती दरम्यान गर्भाशयाचे मुख नैसर्गिकरित्या मोठे होते.या सर्व गोष्टींमुळे प्रसुती झालेल्या महिलेच्या गर्भाशयामध्ये योनीमार्गातून कॉपर-टी बसवणे सोपे जाते.मात्र प्रसुती न झालेल्या महीलेने कॉपर-टी बसवली तर तिच्या गर्भाशयाला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.ज्यामुळे पुढे त्या स्त्रीला कायमस्वरुपी वंधत्व येण्याचा धोका असतो.त्यामुळे तज्ञ अशा महीलांना कॉपर-टी न बसवण्याचा सल्ला देतात.

२. सिझेरियन प्रसुती झालेल्या महिलेला कॉपर-टी बसवण्याचा सल्ला दिला जातो का?

नैसर्गिक प्रसुती असो की सिझेरियन प्रसुती बाळ झालेल्या आईला कॉपर-टी बसवण्याचा सल्ला दिला जातो.सिझेरीयन डिलीव्हरी झालेल्या महिलांना प्रसुतीनंतर चार ते सहा आठवडयांनंंतर कॉपर-टी बसवण्यात येते.

३. कॉपर-टी बसवल्यानंतर पाच वर्ष अनावश्यक गर्भधारणा टाळता येते का?

कॉपर-टी बसवल्यानंतर पाच वर्ष अनावश्यक गर्भधारणा नक्कीच टाळता येते.मात्र एकदा कॉपर-टी बसवली की कधीच डॉक्टरकडे जावे लागत नाही असे नाही.कॉपर-टी बसवल्यानंतर पहिल्यांदा येणा-या मासिक पाळी दरम्यान तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट कडे जाणे गरजेचे असते.तुमचे डॉक्टर कॉपर-टी योग्य ठिकाणी बसली आहे का हे तपासतात.एक महिना जर कॉपर-टी व्यवस्थित बसली असेल तर पुढील पाच वर्ष ती सुरक्षित राहू शकते.असे असले तरी दर वर्षी तुम्ही अधिक सुरक्षेसाठी याबाबतीत डॉक्टरांकडे चेकअप साठी जाणे आवश्यकच आहे.

४. या गर्भनिरोधनाच्या साधनामधील दो-याचा त्रास स्त्रीला होण्याची शक्यता आहे का?

कॉपर-टीच्या दो-याचा त्रास होत नाही.मात्र जर तुम्ही व्हर्जायना स्वच्छ करताना तो ओढण्याचा प्रयत्न केलात तर सहाजिकच त्रास होऊ शकतो.हा दोरा डॉक्टरांना कॉपर-टी योग्य ठिकाणी बसली आहे का हे तपासण्यासाठी व ती काढायची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी बाहेर सोडण्यात आलेला असतो.

या दो-याचा तुमच्या शरीरावर व इतर कोणत्याही गोष्टींवर विपरित परिणाम होत नाही.जर तुम्हाला त्या दो-याची अडचण होत असेल तर तो दोरा पुन्हा योनीमार्गातून आत कसा ढकलायचा याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.पण या परिस्थितीत जर तो जास्त आत गेला तर कॉपर-टी काढताना तो शोधण्यासाठी ऑल्ट्रा सोनोग्राफी करण्याची आवश्यकता भासू शकते.त्यामुळे याबाबत असणा-या तुमच्या शंकाचे निरसन करण्यासाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

५. कॉपर-टी बसवल्यानंतर प्रेगन्ट होणे शक्य आहे का?

कॉपर-टी मधील तांबे या घटकामुळे तीच्या संपर्कात येणारे शुक्राणू नष्ट होतात.त्यामुळे कॉपर-टी बसवल्यानंतर गर्भधारणा होण्याची शक्यता खुप कमी असते.पण जर हे साधन गर्भाशयाच्या आतील बाजूस सरकले असेल तर कदाचित गर्भधारणा होण्याची शक्यता असू शकते.यासाठीच कॉपर-टी च्या दो-याला सतत हात लावू नये.जर तो दोरा सैल झाला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्वरीत तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट कडून याबाबत उपचार करुन घ्या.

६. कॉपर-टी मुळे स्त्री जाड होते का?

ब-याच स्त्रीयांना कॉपर-टी बसवल्यानंतर त्या जाड होतील असे वाटते पण हे खरे नाही.कॉपर-टी चा व तुमच्या जाडपणाचा काहीच संबध नाही.पुरेसा व्यायाम न केल्याने,आहारात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट व फॅटस घेतल्याने किंवा प्रसुतीनंतर येणा-या ताणामुळे महिला जाड होतात. 

७. कॉपर-टी कोणत्याही वेळी बसवण्यात येते का?

जर तुम्ही प्रसुतीनंतर संततीनियमन करण्यासाठी कॉपर-टी बसवत आहात तर तुम्ही हे साधन कधी बसवत आहात हे खुप महत्वाचे ठरते.IUD च्या नवीन नियमांनुसार हे साधन नॉर्मल डिलीव्हरी नंतर लगेच बसवणे गरजेचे आहे.मात्र सिझेरियन डिलीव्हरी नंतर यासाठी चार ते सात आठवडे वाट पाहण्याची गरज आहे.त्यानंतर तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या चौथ्या,पाचव्या किंवा सहाव्या दिवशी हे साधन बसवू शकता.या दिवसांमध्ये कॉपर-टी बसवणे सहज सोपे असते.परंतू त्यानंतर थोडे स्पॉटींग होण्याची शक्यता आहे.

८. कॉपर-टीचा सेक्सलाईफ वर काय परिणाम होतो?
419 views16:30
ओपन / कमेंट
2021-12-29 13:48:24
तुम्हाला संभोग कसा करायला आवडेल? In which way you would like to have intercourse?
Final Results
76%
कपडे काढून/ without clothes
5%
कपडे घालून/ with cloth5
19%
कसा ही/ anything is alright
1.2K voters5.0K views10:48
ओपन / कमेंट
2021-12-03 18:45:50
217 views15:45
ओपन / कमेंट
2021-12-01 17:30:37 अथक परिश्रमाने आपण आपला चावट गप्पा हा मराठी ग्रुप सुरू केला असून येते तुम्ही निव्वळ चावट गप्पा मारू शकता. ह्या ग्रूपचा उद्देश निव्वळ मनोरंजन हा आहे. तरी लवकरात लवकर सर्वांनी सभासद व्हा हीच नम्र विनंती..
आपली मालकीण बाई

गृप लिंक
https://t.me/+CtH5VDz1LlMxNTY1
145 views14:30
ओपन / कमेंट
2021-12-01 10:35:36  गर्भारपणात तुमच्या चेहर्‍यावर अ‍ॅक्ने तसेच केसांचा रुक्षपणा वाढला असेल तर तुमची राणी हे तुमच्याकडून हिरावून घेतयं असा जुना समज आहे. तर तुमच्या केसांचे आणि चेहर्‍याचे सौंदर्य वाढत असेल तर तुम्हांला मुलगा होण्याची शक्यता आहे.

8) वेडींग रिंग  टेस्ट - ही एक फार गंमतशीर चाचणी आहे. स्त्रीच्या साखरपुड्यातील अंगठीने ही चाचणी करायची असते. यामध्ये अंगठी दोर्‍याला बांधुन ती स्त्रीच्या पोटावर धरावी. ती पुढे-मागे सरकल्यास 'मुलगा' तर गोलाकार स्थितीत सरकल्यास 'मुलगी' होण्याची शक्यता आहे. हाच प्रयोग तुम्ही सुईसोबतही करू शकता. यामध्ये ती दोर्‍याला बांधून पोटावर धरावी. जर सुई घडाळ्याच्या काट्यांप्रमाणे सरकली तर 'मुलगी' उलट झाल्यास मुलगा होण्याची शक्यता आहे.

9) गर्भाच्या हृद्याच्या ठोक्यांनुसार- हा थोडा वास्तविक व वैज्ञानिकदृष्ट्या शक्य असा प्रयोग आहे. मात्र याबाबत पुरेसे संशोधन समोर आलेले नाही. गर्भाच्या हृदयाचे ठोके जर 140 bmp पेक्षा अधिक असतील तर ती मुलगी असण्याची शक्यता आहे. तर कमी असल्यास मुलगा असण्याची शक्यता आहे.

टीप - या केवळ शक्यता आहेत. प्रत्येक स्त्रीची परिस्थिती व तिच्यात होणारे बदल वेगावेगळे असतात.म्हणूनच वरील निष्कर्षाच्या विरुद्ध अनुभव आल्यास अचंबित होऊ नये. मुलगा किंवा मुलगी यापेक्षा सदृढ बाळं हे फार गरजेचे आहे
278 views07:35
ओपन / कमेंट
2021-12-01 10:35:36 िक पाळी सुरू होण्यापूर्वी किंवा बंद होण्यापूर्वीचा काळ.
(३) दोन पाळ्यांमधील दोनतीन दिवसांचा काळ, यातला स्त्राव चिकट असतो.
(४) लैंगिक भावना उद्दीपित झाल्यावर किंवा समागम झाल्यानंतरचा काळ.
(५) गर्भारपणाचा काळ.
(६) बाळंतपणानंतरचा २ ते ४ आठवड्यांचा काळ ( म्हणजेच रक्तस्त्राव थांबल्यावर )
या काळातील अंगावर जाण्याचं प्रमाण जास्त नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही.
◆ लक्षणं

योनीमार्गातून पांढरा, चिकट स्रव बाहेर पडणं
योनीमार्गात खाज येणं
कंबर दुखणं
चक्कर येणं
अशक्तपणा जाणवणं
बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
डोकं दुखणे
पोट फुगणे.

अंगावर जाण्याचं स्वरूप- म्हणजे कमी जास्त प्रमाण, कमी अधिक चिकटपणा, रंग स्त्रीनं डॉक्टरांना अचूक सांगण आवश्यक आहे. स्त्राव कधी पातळ, तर कधी चिकट, घट्ट, बारीकबारीक कणांच्या स्वरूपातही असू शकतो. अंगावर जात असताना इतर आणखी काही लक्षणे दिसत असतात. घाण वास येणं, कंबर दुखने, योनीमार्गाची जळजळ होणं, टोचत राहणं, योनी मार्गाच्या बाहेरचा भाग काहीवेळा ओला झालेला व सुजलेला आढळतो. अशा तऱ्हेच्या तक्रारी अचानक उद्भवतात असं वाटलं, तरी बहुतेकवेळा त्या खूप जुन्हाही असू शकतात. योनीमार्ग किंवा गर्भाशयमुखाशी जंतुसंसर्ग झाल्यामुळं अंगावर पांढरं जात असतं हे जंतू अत्यंत सूक्ष्म असतात. त्यात बुरशीचे जंतूही असतात हे जंतू एकमेकीत पसरायला वेळ लागत नाही. अस्वच्छ संडास, कमोड्स, मोरी किंवा एकच टॉवेल वापरणे यामुळे हे जंतू एका स्त्रीकडून दुसऱ्या स्त्रीकडे जायला वेळ लागत नाही. समागमामुळेही हे जंतू पसरू शकतात आणि जंतूंचा प्राडूर्भाव वरचेवर होत राहतो. पुरुषातही हे जंतू जातात, पण सामान्यतः त्याची काहीच तक्रार नसते. बाळंतपणात योगीमार्ग योग्यपणे शिवला गेला नाही तर हे जंतू सहजपणे स्त्रीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. वाढत्या वयाच्या मुली आणि वयस्कर स्त्रियांकडून या अवयवांची नीट स्वच्छता राखली गेली नाही तर त्यांना या जंतूंचा बालपणीच संसर्ग होऊ शकतो. यासाठीच मुलांना गुदद्वार पुढच्या बाजून मागच्या बाजूला हात नेऊन धुण्याची शिकवण द्यावी. मागून, पुढे गुदद्वार धुण्याची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे मल कण पुढील भागात येऊन मूत्राशयात, योनीमार्गात जाण्याची शक्यता असते. योनीद्वारात जंतूंचा विशेषतः बुरशीच्या जंतूंचा संसर्ग हा सर्वसामान्यपणं गर्भारपणात होतो. तसंच मधुमेह असलेल्या स्त्रियांना किंवा लघवी वाटे साखर जाणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा जंतू संसर्ग गुप्तरोगामुळे होऊ शकतो. पेशंटनं जर सविस्तरपणे सर्व लक्षणं डॉक्टरांना सांगितली तर डॉक्टर तपासणी करून नेमकं कारण ठरवू शकतात. त्यामुळे त्यावर योग्य तो उपचारही करता येतो.

◆ कारणे

थंडी वाजल्याने
शरीराची स्वच्छता न राखल्याने
गर्भाशयाला सूज येणं,
वारंवार गर्भपात करणं,
अधून मधून अंगावरून रक्त जाणं,
अधिक मसालेदार पदार्थाचं सेवन करणं..
गर्भाशयाच्या गाठी,गर्भाशयाचा कॅन्सर ,पॉलीप ,बीजकोशाचा टुमर,अंग बाहेर येणे,,मानसिक ताण तणाव...

◆धोक्याचा इशारा केव्हा

योनी मार्गात खूप खाज सुटणे ,आग जळजळ होणे .
स्त्रावाला घाण वास सुटणे ,स्त्रावाचा रंग पिवळा किवा हिरवा होणे .
ताप येणे .

◆काय काळजी घ्यावी?

दररोज योनीमार्गाची स्वच्छता राखणं आवश्यक असतं.
प्रत्येक वेळी मूत्रविसर्जनानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुणं आवश्यक आहे.
शरीरसंबंधांनंतरही स्वच्छता राखणं आवश्यक आहे.
मधुमेह वगैरेसारखे विकार ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे.

काहीवेळेस महिला फक्त पांढरं जातं आहे म्हणून दुर्लक्ष करतात. त्यांचे पडणाऱ्या डागाकडे लक्ष नसते. त्यात रक्ताचाही अंश असण्याची शक्यता असते, ते केवल पांढरं जाणं नसतं. जर स्त्रावातून रक्ताचा अंश जात असेल तर गर्भाशयाच्या कॅन्सरची दाट शक्यता असते आणि त्या डागांकडे बऱ्याच काळपर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळं हा कॅन्सर प्रगत आणि बरा न होण्याची पायरी गाठतो. नेहमीपेक्षा केवळ जास्त प्रमाणात अंगावर जात आहे अशी समजूत स्त्रियांची होत असल्याने कॅन्सर प्राथमिक अवस्थेत उघडकीला येऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं याक्डे दुर्लक्ष न करणं तिच्याचं हिताच आहे.
ल्युकोरिया
कारण
खूप आळशी जीवन, मांस, मासे अंडी, अल्कोहोल, चहा-कॉफी, कामोटेझॅक आणि अश्लील साहित्य, जास्त संभोग, औंधा आसनांचा वापर करणे, संभोगाच्या वेळी अत्यधिक घर्षण आघात, रोगी माणसासह उत्तेजक घटकांचा जास्त सेवन लैंगिक संबंध, गर्भ निरोधक गोळ्यांचा अति प्रमाणात सेवन इ. वारंवार गर्भपात करणे देखील एक प्रमुख कारण आहे.

◆काय खावे: -
हिरव्या भाज्या, केळी, द्राक्षे, सफरचंद, संत्री, डाळिंब, आवळा, पपई, चिकू, गव्हाची चपाती, सिंघाडाचे पीठ, जुने तांदूळ, तांदळाचे पीठ, दलिया, देसी गाईचे दूध, तूप, ताक, लोणी, , मूग डाळ, कच्च्या केळीची भाजी.

◆ काय खाऊ नये: -
मिरची, तळलेले पदार्थ,आंबट, अरबी, वांगे, मोड आलेले धान्य.
उपचार ---
★ नागकेशर: -
3 ग्रॅम नागकेशर ताक बरोबर घेतल्यास श्वेतप्र
269 views07:35
ओपन / कमेंट
2021-12-01 10:35:36 *श्वेतप्रदर- अर्थात-अंगावरून पांढरे जाणे* -Leucorrhea

अंगावरून पांढरा स्त्राव जाणं म्हणजेच ल्यूकोरिया आणि यामुळेच योनीमार्गाचा बाहेरील भाग जास्त प्रमाणात ओला राहतो. हा पांढरा स्त्राव किंवा हा जादा ओलसरापणा कोणत्याही वयात होऊ शकतो. जन्माच्या पहिल्या दिवसापासूनही मुलीच्या अंगावर पांढर जात असल्याची उदारहरणं आढळत असतात. ज्या अर्भकाच्या अंगावर पांढरं जात असतं, तिची आई किंवा नर्स यांच्या ते लक्षात येऊ शकतं. चार पाच वर्षापर्यंतच्या मुलीच्या अंगावर जात असेल तर, तेही आई किंवा नर्सला समजू शकतं. कारण या वयापर्यंतच्या मुलीची अंघोळ, स्वच्छता त्याच करीत असतात. चौदा दिवसांपर्यंत ज्या मुलींच्या अंगावर जातं तो पांढरा स्त्राव जास्त चिकट असू शकतो. अर्थात हा स्त्राव लक्षात आल्यावर त्याची गंभीर दखल घेण्यासारखं काही नसतं. निर्जंतूक कापसाच्या बोळ्यानं तो अवयव स्वच्छ ठेवावा एवढी काळजी मात्र घ्यावी. इतर कोणत्याही उपचाराची आवश्यकता नाही. जवजात अर्भकाच्या अंगावर पांढरा स्त्राव जायचं कारण म्हणजे आईची हार्मोन्स अर्भकाच्या रक्तात मिसळतात.
स्त्रीच्या योनीतून स्राव होणे याला अंगावरून पांढरे पाणी जाणे असेही म्हंटले जाते. कित्येक महिलांना अंगावरून पाणी जाणं किंवा श्वेतपदराच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मात्र कित्येकदा याकडे महिला दुर्लक्षच करताना दिसतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.
अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल.सगळ्याच स्त्रियांना योनीमार्गात ओलासर पणा जाणवतो. योनीतून झिरपणाऱ्या पाण्याला योनिस्राव किंवा पांढरे पाणी असे म्हणतात.
श्वेतप्रदर हा काही गंभीर आजार नाही. तर गर्भाशयाशी संबंधित ही समस्या असल्यानं मानलं जातं. ही समस्या सर्वसामान्यपणे महिलांमध्ये आढळते. त्यात योनीमार्गातून अंगावरून पांढरा स्रव बाहेर पडतो. त्यालाच अंगावरून पांढरं जाणे, पाणी जाणे किंवा श्वेतप्रदर असं म्हणतात. हा स्रव कधी कधी निळसर, पिवळा, दुधाप्रमाणे, गुलाबी, घट्ट आणि कधी कधी काळ्या रंगाचाही असतो. सर्वसाधारणपणे पांढरा-पारदर्शक स्रव बाहेर जातोच, मात्र वरीलप्रमाणे त्यात रंग दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी. नाही तर हा आजार गंभीर आजाराचं स्वरूप धारण करतो.
या पाण्यामुळे योनी स्वच्छ राहते. स्वाभाविक ओल किंवा पांढरे पाणी आतील कपडे खराब करत नाही. आतील कपडे खराब होतील इतक्या प्रमाणात जर पांढरे पाणी जात असेल तर मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट असते.
काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. बीज बिजकोषातून बाहेर पडल्यावर (२४ ते २८ तास पाळीच्या मध्यावर), गरोदरपणी आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाऊन कपडे खराब होऊ शकतात. हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मानसिक त्रास, रक्तपांढरी (रक्त कमी झाल्यामुळे) , झोप येत नसल्यास, असंतुलित आहार यामुळे सुद्धा अंगावरून नेहमीपेक्षा थोडे जास्त पांढरे पाणी जाऊ शकते.

काही वेळा मात्र अति प्रमाणात अंगावरून पांढरे जाते. यामुळे आतील आणि काही वेळा बाहेरचे सुद्धा कपडे ओले होतात. जंतूलागण झाल्याने असे आजार होऊ शकतात. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराच लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.
पाच वर्षांवरची मुलगी, पांढरा स्त्राव होऊ लागला, तर त्याबद्दल आईला सांगू शकते. परंतु तरीसुद्धा वयाच्या बारा वर्षांपर्यंतच्या काही मुलींना डॉक्टरांकडे नेलं जातं. कारण या वयातही बऱ्याच मुली अशा स्त्रावाबद्दलची तक्रार करीत नाहीत. वाढत्या मुलींच्या बाबतीत असा स्त्राव जाऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. डॉक्टरांनी पूर्णपणे आतून तपासणी करणही काही वेळा आवश्यक असतं. शाळेतील मोठ्या मुली आणि लग्नाच्या आधीच्या मुली अंगावर जास्त पांढर जाण्याबद्दल तक्रार करतात. त्याची, लग्न झालेल्या स्त्रियांची तपासणी जशी करतात, तशी तपासणी करून घेणं आवश्यक आहे. पांढरं जाण्याची काही कारणं लग्न झालेल्या आणि अविवाहित स्त्रियांच्या बाबतीत सारखी असू शकतात.
लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

◆ जास्त स्त्राव केव्हा होतो ?

कधी जास्त प्रमाणात अंगावर जाउ लागतं. तेही तसं त्यावेळेपुरतं नॉर्मलच असतं. हा काळ म्हणजे –
(१) वयात आल्याबरोबरचा काळ.
(२) मास
269 viewsedited  07:35
ओपन / कमेंट