2024-03-25 21:48:14
योग्य वेळात योग्य नियोजन असेल तर
नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळते मित्रा
स्वतःला कधी कमजोर समजू नको मित्रा या दुनियेतला सर्वात ताकतवर माणूस तूच आहे
त्याने वर्दी मिळवली त्याला दोन हात होते त्याला दोन पाय होते
तुला पण सेम तेच आहे
मंग तू का नाही मिळवू शकत
तू पण मिळवणार आणि मिळवणारच
आईच्या पोटातून कोणीही शिकून आलेलं नसतं
1 ली पासून ते 12 वी पर्यंत अभ्यास करण्याचा कंटाळा केला असेल तू
आता स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी तुला मेहनत करावीच लागेल आणि अभ्यास करावाच लागेल....
कधी स्वतःला म्हणूनच नको
मला नाही जमणार
तुला जमणार आणि तू खाकी वर्दी मिळवणारच मित्रा
आतापर्यंत तू लोकांना भरपूर वेळ देत आलेला आहे
तू कधी तुला स्वतःला वेळ दिलेला आहे का हा विचार कर.....
आई वडील भाऊ बहीण यांना किती आशा असेल तुझ्यावर
माझा भाऊ पोलीस भरती ट्राय करतोय
पोलीस झाला पाहिजे
मित्रा यांची आशाची निराशा करू नको
येणारा काळ तुझाच आहे
एक वेळा तुला वर्दी मिळाली तर संपूर्ण आयुष्य तुझ बदलून जाईल
ज्या लोकांनी तुला गावांमध्ये कधी पाणी पाजलं नाही तेच लोक तुला घरी घेऊन जाऊन चहा जेवण मान सन्मान सर्व देतील
तेव्हा तुझं नाव घेऊन कोणीही तुला
हाक मारणार नाही
तू सर्वांसाठी भाऊ दादा साहेब राहशील
भरती कधी होईल हा विचार करूच नको तुला युद्ध लढायच आहे तू युद्धाची पूर्ण तयारी करून ठेव
साप्ताहिक हप्त्यातून एक ते दोन वेळा कामाला जरी गेला तरी चालेल पण तू अभ्यास सोडू नको जोपर्यंत बघितलेला स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आग डोक्यात आणि मनात राहिलीच पहिजे
14.0K views18:48